Maharashtra Weather Updates :- राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD) येत्या चार दिवसांत राज्यात पुन्हा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार या आठवड्यात राज्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Updates
याशिवाय महाराष्ट्रातील नाशिक, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ येथे शनिवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तोपर्यंत येथे हलक्या सरीही अपेक्षित आहेत. येत्या चार दिवसांत जळगाव, अहमदनगर, पुणे येथे काही वेळा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
फळबाग लागवड योजना; अनुदानासह शेकऱ्यांना मिळणार मोफत रोपे
Maharashtra Weather
हे नोंद घ्यावे की गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात सुमारे पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे 80 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सरकार नुकसानीचा पंचनामा करत आहे.
हा फॅन लावला तर विसरुन जाल AC-कूलर, यातील टॅक्नॉलॉजीमुळे भर उन्हात राहाल कूल-कूल
📢 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पहा जाहिरात व भरा फॉर्म ! :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार असतो का ? :- पहा कायदा